मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

पोलिस हुतात्मा दिवस






                                            सर्वप्रथम पोलिस हुतात्मा दिनानिमित्त सर्व शहीद पोलिस बांधवाना माझ्या परिवार,मित्रमंडळी आणि तमाम भारत देश बांधवांतर्फे विनम्र अभिवादन…। 



                                            काल २१ ऑक्टोंबर म्हणजेच पोलिस हुतात्मा दिन.२१ ऑक्टोंबर १ ९ ५ ९ ला लद्दाख च्या सीमेवर भारत चीन युध्द झाले होते. तत्कालीन युद्धात आपल्या सी. आर. पि. एफ च्या १० जवानांनी चीनची आख्खी एक बटालियन रोखून धरली चीनी सैन्याला एक इंच सुद्धा आपल्या वतन काबीज करू दिला नाही.आणि त्या युद्धात लढणाऱ्या सर्व जवानांनी आपल्या साठी हौतात्म्य पत्करले… तेव्हापासून २1ऑक्टोंबर हा दिवस पोलिस शहीद दिवस संबोधला जातो.


                                            त्या सैनिकांनी शेवटपर्यंत झुंज दिली,रक्तरंजित युध्द लढले. दुर्दैवाने आज आपल्याला त्याच्या हौतात्म्याचा विसर पडलाआहे . काल वृत्तपत्रात,टीव्ही,फेसबुक इ. सामाजिक माध्यमांवर कुठेच मला पोलिस हुतात्मा दिवस असा उल्लेख आढळला नाही…
                                            एरव्ही तासनतास फेसबुकवर काही बाही फोटो शेअर करणारे अन च्याटिंग करणारे आपण युवक शहीद पोलिसांना ५ मिनिट देखील श्रद्धांजली वाहू शकलो नाही???एवढेच नव्हे तर समाजाचा आरसा,लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या आपण पत्रकारांनी देखील चार ओळींची बातमी देऊन शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहू शकलो नाही तथापि समाजाला देखील स्मरण करून दिले नाही…. पक्षश्रेष्टींच्या वाढदिवसानिमित्त किवा पुत्रांच्या लग्नावर बेसुमार खर्च करणारे ,फलक छापणारे , हजारोंच्या जाहिराती देणाऱ्रे ,मोठमोठ्या सभा आयोजित कंरनारे आपले नेते,लोकप्रतिनिधी एक आर्धा तासाची जाहीर स्मरण सभा आयोजित करू शकले नाहीत…. याशिवाय शाळा महाविद्यालयांमध्ये इतर पार्ट्या साजर्या केल्या जातात मग हुतात्मा दिनच का साजरा केला जाऊनायर नये?????




                               २६/११ च्या हल्ल्यात अन आताच पुंडलिक माने यांनी वीरमरण पत्करले…… या वर्षात ५७६ पोलिस जवान कर्तव्य बजावत असताना धारातीर्थी पडले…… त्या सर्व जवानांच्या शहादतीची किंमत आपल्या सर्वांना कळणे खूप गरजेचे आहे…… काल औरंगाबाद आयुक्तालयात पोलिस हुतात्म्यांना मानवंदना दिली तेव्हाचा फोटो वरती टाकला आहे…


                                शेवटी पुन्हा एकदा शहीद पोलिसांना मनापासून मानवंदना देतो…

              सांगायचं एवढच कि …………


                                     
  ए मेरे वतन के लोगो,
                                        जरा आखो मे भरलो पाणी,
                                        जो शहीद हुवे है उनकी
                                        जरा याद करो कुर्बानी,

                                जरा याद करो कुर्बानी…............……!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा