गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

फ्रेशर्स पार्टी

                                                                फ्रेशर्स पार्टी

सध्या कॉलेजात फ्रेशर्स पार्टीचे नगारे वाजू लागले आहेत… कोलेजातला प्रत्येकजण फ्रेशर्स पार्टीच्या तयारीला लागला आहे . कुणी गाणे गाणार आहे,तर कुणी डान्स,नाटक करणार आहे….प्रत्येक जण जोमाने पूर्वतयारी करतो आहे. फिश फिश पौंड शोधण्यात सर्वच मग्न झाले आहेत….
एरव्ही जगाच्या पाठीवर सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्राचे ज्ञान मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या पत्रकारितेच्या विध्यार्थ्यांच्या तोंडात ""फ्रेशर्स पार्टी '''' हा शब्द मात्र लागोपाठ ऐकायला येतोय.
नेहमीच कॉलेजला दडी मारणारे विध्यार्थी देखील फ्रेशर्स पार्टीच्या तयारीसाठी स्वतःला वाहून घेत आहेत… कोलेजातल्या युवकांमध्ये काधीनाव्हे एव्हढा उत्साह संचारलाय… कॉलेजात पाय ठेवताच क्षणी ''फ्रेशर्स…. फ्रेशर्स…. फ्रेशर्स….''' हाच शब्द कानी पडतो आहे…
का??का??का??एवढा आटापिटा कशासाठी???? ६५ वर्षापूर्वी आपले सैनिक सीमेवर स्वातंत्र्यासाठी लढले ऱक्त सांडून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले…. त्या शहिदांचे स्मरण म्हणून कधीतरी '''''''''शहीद दिवस'''''''''' साजरा केला का आम्ही युवकांनी??मुळात शहीद दिवस कधी असतो हेच आजचा तरुण विसरलाय… भगतसिंग,राजगुरू,सुखदेव अश्या असंख्य तरुण क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आज तरुण '''क्रांतिदिन''' विसरलाय … टिळक, आगरकर,सुभाषचंद्र बोस,स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या हिंदुस्थानासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या वीरांचा हुतात्मा दिवस विसरलाय आजचा युवक…. ! आपल्या प्राणांचे बलिदान देऊन आपणास गुलामीतून मुक्त केले आणि आपल्याला श्वास घेण्यासाठी स्वातंत्र्य मिळवून दिले. अश्या वीर हुतात्म्यांचे स्मरण देखील आजचा युवक (आम्ही) करू इच्छित नाही हे मोठ दुर्दैव आहे…
फ्रेशर्स पार्टीसाठी १० दिवस पूर्वीपासून झटणारे आम्ही आज या महामानवांचे विचार आत्मसात करण्यासाठी का एक तासाचाही समारंभ आयोजित करू इच्छित नाही…फ्रेशर्स पार्टीसाठी जेव्हढा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे… तोच उत्साह देशकार्यासाठी का दाखवत नाही…????आज स्त्रियांचे रस्त्यावर फिरणे मुश्किल झालेय… समाजात विकृत भावना अधिकाधिक रूढ होत चाललीये… देश आर्थिक संकटात सापडलाय,दुष्काळाने शेतकरी खच्चून गेलाय,अशा परिस्थितीत देशाला एका व्ग्ल्या दिशेची गरज आहे,, स्वातंत्र्यासाठी सांडलेल्या रक्ताची जाण असणे आवश्यक आहे… हुतात्म्याची क्रांतीकारकांची आणि तत्त्वज्ञांच्या विचारांची जोड आपल्याला असेल तरच भारत पुढे जाईल…। मग जर आम्ही युवक फ्रेशर्स पार्टीत कुठल्यातरी गाण्यावर थिरकायच,नाटक करायची,फिश पौंड टाकून याची न त्याची उडवायची असा हा बहुमुल्य वेळ आणि ते काही दिवस फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली व्यर्थ घालवायचा,,,,
परंतु तोच वेळ जर स्त्री जर स्त्री सुरक्षेविषयी समाजात जनजागृती करण्यात घालवाव … पर्यावरण जागृती ,सेव वाटर,तसेच श्रम दान ,असे विविध समाजहिताचे उपक्रम राबवले तर नक्कीच देश प्रगतीसाठी आपण महत्वाचे योगदान देऊ शकू … याशिवाय अशा पार्ट्यांवर केला जाणारा खर्च गरीब आणि होतकरू विध्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च करु शकतो…


पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण डोक्यावर मिरवतोय …पण आपण लोकशाहीसाठी काय करतोय???,समाजाप्रती आपण पार्ट्या साजर्या करून कर्तव्य व्यक्त करोय हे कितपत बरोबर आहे ????नाव्विद्यार्थ्याचे स्वागतच करायचे असेल तर त्यांना आपण कशाप्रकारे समाजाभिमुख पत्रकारितेचे मुलभूत पैलू पटवून दिले हेच खरा त्यांचा स्वागत होईल….मला कुणाला दोषी ठरवायचं नाहीये …. परंतु आजच्या पुरोगामी महाराष्टात या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत… 

..................मयुरोदय...................!