शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३

शेवटी सचिनही माणूसच आहे!

डिसेंबर २०१२ला सचिन तेंडुलकरने एक दिवसीयक्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हा दिवसतब्बल २२ वर्षं आणि ९१ दिवसांनंतर आला. या प्रदीर्घकाळात हा विक्रमादित्य ४६३ सामने, १८,४२३ धावा, ४९ शतकं, ९६अर्धशतकं, एकदिवसीय सामन्यातीलएकमेव द्विशतक, असे अनेक विक्रम काळाच्या पडद्यावर रेखाटूनगेलाय. सर डॉन ब्रॅडमन ज्याचे प्रशंसक होते,क्रिकेटवेड्या असलेल्या आपल्या देशात ज्याला देव मानलं जातं,ज्याची विकेट मिळवणं हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्नंअसतं आणि ज्याच्या काळाचे साक्षीदारअसल्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे,त्याची निवृत्ती मात्रआपल्याला म्हणावी तेवढी सलली नाही.माध्यमांचा लाडका असलेल्या सचिनबद्दल केवळ दखलघेण्यापलीकडेमाध्यमांनी कसलाही गाजावाजा केला नाही.त्याच्या संघ सहका-यांनाही त्याचा हा निर्णयधक्कादायक वाटला नाही.त्याच्या चाहत्यांनीही त्याला परत येण्याचंआवाहन केलं नाही. कुठे रडण्याचा आवाजआला नाही की उसासे टाकले गेलेनाहीत. ऐकू आले ते फक्त सुटकेचे, समाधानाचे

निःश्वाजस आणि एक कुजबूज, की सचिनचा निर्णययोग्यच आहे पण वेळ चुकली. असं का व्हावं?२०११ साली भारताने विश्वं कप जिंकल्यानंतरच

सचिनच्या निवृत्तीची चर्चा सुरूझाली होती. कारण त्यानंतरचत्याच्या खेळातला डौल कमी होत चालला होता. त्यानेकधी निवृत्ती घ्यावी,का घ्यावी, का न घ्यावी असे सल्ले देणं सुरुझालं होतं. सचिनवर आपण पराकोटीचं प्रेम केलंय हेकबूल करायला कोणालाच संकोच वाटणार नाही.आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर त्यानेगेली तेवीस वर्षंआपल्याला आणि आपल्या देशाला एक आदर मिळवून दिला,हेही कोणी नाकारणार नाही.तो ज्या काळात खेळायला आला त्या काळापासून आजपर्यंतया देशाच्या क्रिकेटमधील प्रत्येकमहत्त्वाच्या घटनेला सचिनचा संदर्भ आहे. ‘टाइम’ साप्ताहिकानेयाचा एका लेखात अचूक उल्लेख केलाय.काय म्हटलंय त्यात?‘ज्या वेळी या ग्रहावरील प्रत्येकव्यक्तीवर काळ आपला प्रभाव गाजवतहोता त्या वेळी त्याने फक्त एकाच माणसाचा अपवादकेला. सचिनसमोर काळही जणू गोठला होता.आपल्याला चॅम्पियन्स मिळालेत, लीजंड्स मिळालेत-मिळतीलही, पण आपल्याला दुसरा सचिनमिळाला नाही, आणि कधीचमिळणारही नाही.ज्या वेळी सचिनपाकिस्तानला आपला पहिला सामना खेळायला गेला त्यावेळी शुमाकरहे नाव फॉर्म्युला-वन रेसशी जुळायचंबाकी होतं. लान्स आर्मस्ट्रॉंग अजून टूरडी फ्रान्सवर गेला नव्हता. पीटसॅम्प्रासने अद्याप एकही ग्रॅन्ड स्लॅम जिंकलेलंनव्हतं. ज्या वेळी सचिन ‘सचिन’ बनतहोता त्या वेळी जगाने रॉजर फेडररचंनावही ऐकलं नव्हतं.लिओनेल मेस्सी अद्याप रांगत होता. उसेन बोल्टजमैकाच्या गल्लीबोळांतून पळणारा एक मुलगा होता.बर्लिनची भिंतपडलेली नव्हती. रशियाचे तुकडे झालेनव्हते. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचं अर्थशास्त्रबदलायचं अजून बाकी होतं.’‘टाइम’चा हा लेख समस्त भारतीयांची मानअभिमानाने ताठ व्हावी असाच आहे, पणत्याची वेळ चुकली. कारण मुळातसचिनचीच वेळ चुकली. त्याचवेळी ‘टाइम’लाही सांगावंसं वाटतं,की भारतीयजनता आता पूर्वीसारखी राहिली नाही.मायकेल शुमाकर यशस्वी होऊन निवृत्त झाला,पुन्हा परतला आणि अपयशी ठरून त्याला जावं लागलं.पीट सॅम्प्रासने योग्य वेळ साधतनिवृत्ती पत्करली. पण, सचिनने यातूनधडा घेतला नाही. त्यामुळेच तो निवृत्त झाल्यावरत्याच्या आजवरच्या कर्तृत्वाला साजेसा निरोप त्याच्या असंख्यचाहत्यांनी त्याला दिला नाही, हे कटू सत्यआहे.माजी फिरकी गोलंदाजइरापल्ली प्रसन्ना म्हणतात,‘सचिनच्या निवृत्तीने आता निवड मंडळाला हायसं वाटलंअसणार. त्याला एकदिवसीय सामन्यातूनवगळण्याची वेळ त्यांच्यावरआली नाही म्हणून त्यांना आनंदझाला असेल. तो खेळतराहिला असता आणि अपयशी ठरला असता तर संघावरचंओझं झाला असता.’ प्रसन्ना हे सारंसचिनच्या निवृत्तीनंतर बोलले तो भाग वेगळा, पणत्यांची ही टीका विक्रमादित्यसचिनसाठी नक्कीच क्लेशदायकहोती. पण, निवड समितीचे प्रमुखसंदीप पाटील यांनी पाकिस्तानदौ-यासाठी संघनिवडीच्या वेळी सचिनला ‘त्याचंसंघातील स्थान त्याने गृहीत धरू नये’,असा जो सौम्य शब्दांत सूचक इशारा दिला तो लक्षात घेता स्पष्टचहोतं, की सचिनला संघातूनवगळण्याची तयारी निवडसमितीने केली होती.या गोष्टीची दबक्या आवाजातझालेली चर्चाही तितकीचखरी होती. त्यामुळेच क्रिकेटचा देवमानल्या गेलेल्या, आपल्या चौकार-षट्कारांमध्ये अचूक टायमिंग साधणा-या आणि संघातील एक विचारी, समंजस,मार्गदर्शक अशी प्रतिमा असलेल्या सचिनचंनिवृत्तीबाबतचं टायमिंग का चुकलं, हा प्रश्नत्याच्या चाहत्यांना, क्रिकेट रसिकांना पडणं स्वाभाविक आहे.सचिनने निवृत्तीसाठी इतका वेळका घेतला आणि अजूनही कसोटीतूननिवृत्ती का घेतली नाही याचंएक कारण त्याचे जाहिरातदार आहेत, असंही सांगितलंजातंय. सचिन आज सतरा कंपन्यांच्या ब्रँडेडवस्तूंच्या जाहिराती करतोय. हा सारा शंभरकोटींच्या घरातला व्यवहार आहे. सचिनचं करारसंपण्याआधीच निवृत्त होणं या कंपन्यांना परवडणारंनाही. त्यामुळे खेळतराहण्यासाठी त्यांचा अप्रत्यक्ष दबाव सचिनवर असूशकतो, असंही काहींचं म्हणणं आहे.अर्थात कोणाचं काहीही म्हणणं असो,सचिनने आपल्या सर्वांना जे आनंदाचे क्षण दिलेत तेकधीच विसरता येणार नाहीत. ‘निवृत्तझाल्यानंतर चाहत्यांच्या मिळालेल्या संदेशाने आपण भारावलोयत,त्याचा आनंद आहे आणि डोळ्यांतपाणीही आहे,’ असं सचिनने म्हटलंय.तो असंही म्हणाला,की ‘एकदिवसीय क्रिकेटमधीलहे जादुई क्षण कायम माझ्यासोबत राहतील.’ तेआपल्याही सोबत राहणार आहेत. पणतरीही त्याच्या जाण्याने आज डोळ्यांतपाणी मात्र तरारलंनाही हेही तेवढंच खरं. कारणया देवाची वेळ चुकली.शेवटी सचिनही माणूसच आहे!