मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

पोलिस हुतात्मा दिवस






                                            सर्वप्रथम पोलिस हुतात्मा दिनानिमित्त सर्व शहीद पोलिस बांधवाना माझ्या परिवार,मित्रमंडळी आणि तमाम भारत देश बांधवांतर्फे विनम्र अभिवादन…। 



                                            काल २१ ऑक्टोंबर म्हणजेच पोलिस हुतात्मा दिन.२१ ऑक्टोंबर १ ९ ५ ९ ला लद्दाख च्या सीमेवर भारत चीन युध्द झाले होते. तत्कालीन युद्धात आपल्या सी. आर. पि. एफ च्या १० जवानांनी चीनची आख्खी एक बटालियन रोखून धरली चीनी सैन्याला एक इंच सुद्धा आपल्या वतन काबीज करू दिला नाही.आणि त्या युद्धात लढणाऱ्या सर्व जवानांनी आपल्या साठी हौतात्म्य पत्करले… तेव्हापासून २1ऑक्टोंबर हा दिवस पोलिस शहीद दिवस संबोधला जातो.


                                            त्या सैनिकांनी शेवटपर्यंत झुंज दिली,रक्तरंजित युध्द लढले. दुर्दैवाने आज आपल्याला त्याच्या हौतात्म्याचा विसर पडलाआहे . काल वृत्तपत्रात,टीव्ही,फेसबुक इ. सामाजिक माध्यमांवर कुठेच मला पोलिस हुतात्मा दिवस असा उल्लेख आढळला नाही…
                                            एरव्ही तासनतास फेसबुकवर काही बाही फोटो शेअर करणारे अन च्याटिंग करणारे आपण युवक शहीद पोलिसांना ५ मिनिट देखील श्रद्धांजली वाहू शकलो नाही???एवढेच नव्हे तर समाजाचा आरसा,लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या आपण पत्रकारांनी देखील चार ओळींची बातमी देऊन शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहू शकलो नाही तथापि समाजाला देखील स्मरण करून दिले नाही…. पक्षश्रेष्टींच्या वाढदिवसानिमित्त किवा पुत्रांच्या लग्नावर बेसुमार खर्च करणारे ,फलक छापणारे , हजारोंच्या जाहिराती देणाऱ्रे ,मोठमोठ्या सभा आयोजित कंरनारे आपले नेते,लोकप्रतिनिधी एक आर्धा तासाची जाहीर स्मरण सभा आयोजित करू शकले नाहीत…. याशिवाय शाळा महाविद्यालयांमध्ये इतर पार्ट्या साजर्या केल्या जातात मग हुतात्मा दिनच का साजरा केला जाऊनायर नये?????




                               २६/११ च्या हल्ल्यात अन आताच पुंडलिक माने यांनी वीरमरण पत्करले…… या वर्षात ५७६ पोलिस जवान कर्तव्य बजावत असताना धारातीर्थी पडले…… त्या सर्व जवानांच्या शहादतीची किंमत आपल्या सर्वांना कळणे खूप गरजेचे आहे…… काल औरंगाबाद आयुक्तालयात पोलिस हुतात्म्यांना मानवंदना दिली तेव्हाचा फोटो वरती टाकला आहे…


                                शेवटी पुन्हा एकदा शहीद पोलिसांना मनापासून मानवंदना देतो…

              सांगायचं एवढच कि …………


                                     
  ए मेरे वतन के लोगो,
                                        जरा आखो मे भरलो पाणी,
                                        जो शहीद हुवे है उनकी
                                        जरा याद करो कुर्बानी,

                                जरा याद करो कुर्बानी…............……!


शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

लेखणी बोले......


काहीतरी लिहायचे असे खूप दिवसापासून वाटतेय पण काय? कोणत्या? विषयावर भाष्य करायचे हे तर खूप अवघड काम आहे? असे आता वाटू लागले. कारण लेखणी बोलली कि तिच्यावर आक्षेप घ्यायला, तिचे तोंड दाबायला काही लोकं उभे असतात.
 असो, पण सुरवात काय आणि कोणत्या विषयावर करावी असे झाले आहे. अस प्रत्येकाच होत का? माहिती नाही, पण मला अस वाटू लागलं कि प्रत्येक क्षेत्रात पाउल ठेवणाऱ्या व्यक्तीचं असाच होत असणार, नाही समजल तर मग समजावून घेऊ. मी जेव्हा एखादी कथा, चारोळी, कविता, लेख असे जेव्हा वाचतो तेव्हा मला नेहमी वाटत कि मी जर हे लिहील असत तर,
जेव्हा एखादा चित्रपट पाहतो? तेव्हा नेहमी वाटत जर आपण हा चित्रपट लिहिला असता तर. यातली गाणी लिहिली असती तर, काय राव तुम्ही म्हणाल याला वेड-बीड लागलं कि काय. पण खर सांगू मित्रानो,आता मला पत्रकारितेला प्रवेश घेतल्यापासून लिहायलाच खूप आवडतय…. मी हल्ली खूप शांत शांत असतो. कारण आता मला निरीक्षण करायची सवय लागलीय… आणि  केलेलं तेच निरीक्षण कागदावर उतरवण्यासाठी मला माझी लेखणीच फक्त साथ देते फक्त आणि फक्त लेखणीच………………… !

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

मी माझा...


ही कविता मी पुढारी वर्तमानपत्रात वाचली होती. ती मला आवडली म्हणून इथं देत आहे.

मी माझा...

मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
वाळकं पानसुद्धा गळताना
तन्मयतेने पाहणारा

माझ्या हसण्यावर जाऊ नका

माझ्या रुसण्यावर जाऊ नका
जरी मी तुमच्यात बसलो
तरी माझ्या असण्यावर जाऊ नका
मला पक्कं ठाऊक आहे
प्रत्येक गोष्टीला अंत आहे
म्हणूनच मी काही बोलत नाही
मी अगदी शांत आहे
लोकांच्यात वावरताना मी
माझा तोतया म्हणून वावरतो
कुणी माझं खरं रुप ओळखलं की,
माझ्यातला मी बावरतो.

कधी कधी......!!!!!!!!

                 कधी असही जगाव लागतं....खोट्या हास्याच्या पडद्या आड खरे दुःख लपवाव लागतं....
कर्तव्याच्या नावाखाली स्वतःला राबवाव....इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातलं पाणी लपवाव
लागतं....खुप इच्छा असुन देखील नाही म्हणाव लागतं....खुप प्रेम असुन देखील नाही अस दाखवाव 
लागतं.... अस इतरांना हसवता हसवता कधी खुप रडाव लागतं....कधी कधी असही जगाव लागतं..!!!!!!