शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

लेखणी बोले......


काहीतरी लिहायचे असे खूप दिवसापासून वाटतेय पण काय? कोणत्या? विषयावर भाष्य करायचे हे तर खूप अवघड काम आहे? असे आता वाटू लागले. कारण लेखणी बोलली कि तिच्यावर आक्षेप घ्यायला, तिचे तोंड दाबायला काही लोकं उभे असतात.
 असो, पण सुरवात काय आणि कोणत्या विषयावर करावी असे झाले आहे. अस प्रत्येकाच होत का? माहिती नाही, पण मला अस वाटू लागलं कि प्रत्येक क्षेत्रात पाउल ठेवणाऱ्या व्यक्तीचं असाच होत असणार, नाही समजल तर मग समजावून घेऊ. मी जेव्हा एखादी कथा, चारोळी, कविता, लेख असे जेव्हा वाचतो तेव्हा मला नेहमी वाटत कि मी जर हे लिहील असत तर,
जेव्हा एखादा चित्रपट पाहतो? तेव्हा नेहमी वाटत जर आपण हा चित्रपट लिहिला असता तर. यातली गाणी लिहिली असती तर, काय राव तुम्ही म्हणाल याला वेड-बीड लागलं कि काय. पण खर सांगू मित्रानो,आता मला पत्रकारितेला प्रवेश घेतल्यापासून लिहायलाच खूप आवडतय…. मी हल्ली खूप शांत शांत असतो. कारण आता मला निरीक्षण करायची सवय लागलीय… आणि  केलेलं तेच निरीक्षण कागदावर उतरवण्यासाठी मला माझी लेखणीच फक्त साथ देते फक्त आणि फक्त लेखणीच………………… !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा