शनिवार, २० जून, २०१५

''तांड्यावरल्या परचाराची गोष्ट ''

''तांड्यावरल्या परचाराची गोष्ट ''
साधारणतः 20 की मी चा दाट
झाडाझुडपांनी वेढलेला घाट. आणि त्या घाटात वसलेल शेआठशे लोकसंखेचा तांडा. त्या विधानसभा मतदारसंघातील ते अगदी शेवटच नि दुर्गम भागातल ते गाव.घाट रस्त्याच्या मध्यातुनच तांड्यावर जायला फाटा फुटतो. बैलगाडी कशीबशी वाट काढू
शकेल अशा खडक,दगड धोंड्याच्या रस्त्यावरून आज मतांची भिक
मागण्यासाठी डस्टर,इनोव्हा,तवेरा,स्कार्पियो,क्र
ुजर, जिपा अशा गाड्यांचा ताफा तांड्यावर पोचला.
दिवसभर गुरं ढोरं चरुन आता माणसं आपापल्या दारि तांड्यावर परतत होती. गावच्या अर्धवट अवस्थेत उभ्या वेशीजवळ गाड्यांचा ताफा थांबला,उमेदवारासह कार्यकर्ते गाडीतुन
उतरले .लागलीच याचे-त्याचे पाय धरणीला सुरवात
झाली.डोक्यावर पदर घेतलेल्या बाया बापड्या कुडाच्या घराबाहेर तांदूळेतर
धान्य पाखडीत बसलेल्या, मोठ््या कुतुहलाने त्या उमेदवार कार्यकर्ते
त्यांच्या घोषणा, हात जोडण बघत होत्या लोक आपले पाय पडताहेत याच
त्यांना आश्चर्य वाटत असावं..काहि जणी चुल पेटवत तर
काही झाडझुड करत होत्या.
गावातील पुरुष मंडळी घाटातल्याच काही नापिक जमिनीवर दिवसभर घाम
गाळून जिवाचा आटापिटा करून
ति पिकवण्याची केवीलवाणी धडपड करून आले होते, थकुन भागून अंधार्या कुडात तर काही बाहेर अंधारात गप्पा मारत बसले. 
कोणी म्हातारे बाजेवर पहुडलेले तर
काही पारावरच्या गप्पांत दंग. मीडी,टॉप वर असलेल्या मुली चुंबळ डोक्यावर घेउन भांड्या भांड्याने
कुठल्या तरी झर्यातून पिण्याच पाणी वाहात होत्या.पोरं,युवक मंडळी चकाट्या पिटीत बसली तर
काही खेळण्यात दंग..... लाईटचा दूरपर्यंत खांब दिसत नव्हता.
आतापर्यंत बर्याच पक्षांच्या उमेदवारांची मतदान मागण्यासाठी इकडे चक्कर झालेली दिसत होती.
कारण, ज्या कुडाच्या घरावर
टिव्ही एंटीना नव्हता त्या कुडावर तर
राजकीय पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. ज्या चिमुकल्यांच्या हातात
उजळणी हवी होती, त्यांच्या हातात
''उमेदवारांचे हॅण्डआउट'' दिसत होती.ज्या तरुणांच्या हातात अधुनिक
तंञज्ञान हवे होते आणि स्वयंपूर्ण शिक्षण हवे होते, त्या तरुणांच्या हातात
आणि डोक्यात राजकीय पक्षांच्या टोप्या,झेंडे दिसत
होते.जी माय भाकरी थापत होती तिच्या गळ्यात अलंकारा एवजी पक्षाच्या निशाणीची माळ दिसत
होती . ''............... या निशाणीवरच बटन दाबा'' हे बिंबवण्यात उमेदवाराबरोबर कार्यकर्ते व्यस्त होते.
ज्यांनी उमेदवाराकडे विज, पाणी, रस्ते,शीक्षण
इ सुविधा मागायच्या सोडून ते त्याच कुटट् अंधारात
पैशाची मागणी करत होते,
आणि ''हो नक्की उद्याच पाठवून देतो फक्त लक्ष असु
द्या''''अशी मान डोलवून उमेदवार आपले मत पक्के करून पुढे सरकत
होते.ज्या युवकांच्या तोंडात राष्ट्रगीताची गरज होती त्यांच्या तोंडातून राजकीय पक्षांच्या घोषणा अव्याहत
पणे बाहेर पडत होत्या. तांड्यावरच्या त्या अंधारात अंधारात मोबाईल च्या टॉर्च च्या उजेडात उमेदवार,कार्यकर्ते मत माघत फिरत होते. माय
माऊली चिमणीच्या उजेडात भाकरी थापत बसलि होती.
एका उमेदवाराचा प्रसिद्धी प्रमुख(PRO) म्हणुन घेण्यात माझा मलाच संकोच वाटत होता.
उमेदवारासह गाड्यांचा ताफा परत फीरला, गाड्यांच्या उजेडात
आम्ही त्या घनदाट जंगलात तांड्यापासुन कशीबशी वाट काढली होती. मात्र ते तांडेकरी जगत असलेल्या रोजच्या स्थितीतून कशी वाट काढतील? त्यांना याची गरज वाटत
नसेल का? असंख्य विचार मनाभोवती फिरत होते.
निरागस तांडेकरी मात्र रोज रोज त्याच नेहमीच्या दिनचर्ये
प्रमाणे जगत होते,त्यांना बाहेरच्या जगाचा मागमुसही नव्हता.
लोकशाहीत वाढणार्या त्या तांड्याच जणु काही जगच वेगळ
होत. आपल्या सोयी,सुवीधांची,
हक्कांची जाणीवही त्यांना नव्हती.त्यांच्या याच अजाणते पणाचा फायदा गेली कित्येक वर्षे हे
पुढारी घेत आलेत....
घाट उतरत असताना राज्य सरकारची एक पाटी दिसली ''जंगली श्वापदांचा वावर,''कृपया सावध
राहा'' तांडेकर्यांच तिथल्या चिमुकल्यांच अप्रुप वाटल.
त्या दिवशीची बातमी न लिहिताच
मी विचारात पडलो. गेली 54 वर्षे महाराष्ट्रात असे अनेक
तांडे विकास उदयाच्या प्रतिक्षेत असतील. या मतदानानंतर
तरी पालटेल का ही तांड्यावरच्या प्रचाराची गोष्ट ???????

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा