शनिवार, २० जून, २०१५

प्रिय ...,
मा बळीराजा(मराठवाडा)
                        गेल्या काही वर्षापासून आपला मराठवाडा दुष्काळी सावटात जगत आहे. यंदा नाही पण पुढल्या वर्षी तरी निसर्ग आपल्यावर 'किरपा करील' ह्या आशेने बळीराजा तू चातका प्रमाणे अच्छे दिनाची वाट पाहतो आहे… आज २०१५ उजाडले तरी तुझ्या आत्महत्त्या थांबतील असा समाधानकारक पाउस पडला नाही. परिणामी आत्म्हत्त्यांचा डोंगर अधिकाधिक उंच होत आहे म्हणूनच आज तुला अनवधानाने पत्र लिहितो आहे.
बळीराजा,सकाळी उठल्या नंतर शहरातला प्रत्येक व्यक्ती आधी दार उघडून पेपर हातात घेतो. चहाचा एक एक घोट रिचवत तो बातम्या वाचू लागतो,
कर्जबाजारी शेतकर्याची आत्महत्त्या,
मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर जाहीर करा-विरोधकांची मागणी,
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत,
बीड जिल्ह्यात ३ शेतकर्यानि मृत्यूला कवटाळले,
कापसाला योग्य हमीभाव द्यावा शेतकरी संघटनेची मागणी.
मराठवाड्यात चारा छावण्यांचे राजकारण............................................!
हे आणि असे कित्तेक मथळे तो वाचतो, मनाला वाईट वाटत, काही काळ हळहळतो ,शोक व्यक्त करतो तितक्यात चहा संपतो आणि तो पेपरची उघडलेली घडी बंद करून निघून जातो. हा त्याचा रोजचाच दिनक्रम आणि हो बळीराजा, हा त्याचाच नाही तर इथले राजकारणी,लेखक,कामगार,शासकीय अधिकारी -कर्मचारी, खत विक्रेते, आणि इथल्या धडधाकट तरुणांचाही असाच दिनक्रम.बळीराजा तू तिकडे जीवाच रान कर ओढ ताण करून शेती पिकव आम्हाला धान्य पुरव, आम्हाला परवडेल त्या भावात आम्ही धान्य घेऊ,मिळालेला गहू आई निवडून आणेल आम्ही त्या भाकऱ्या मज्जा मारत खाऊ. यामागचे कष्ट आम्हाला काय कळणार???तुला तुझा खर्च मिळाला काय आणि हमीभाव नाही काय ,कितीही आत्महत्त्या झाल्या आम्हाला कसलच सोयर सुतक नाही.हे आजच वास्तव.
एखाद्या खेड्यात एखाद्या शेतकरी बांधवाने आत्महत्त्या केली कि मग तिथला स्थानिक प्रतिनिधी वृत्तपत्र कार्यालयात बातमी पाठ्वतो,कार्यालयात संपादक ती बातमी रंगवून लावतो दुसर्या दिवशी सगळ जग ते वाचत आणि नंतर ते वृत्तपत्र रद्दीत जमा होत. गावचा तलाठी पंचनामा करतो काही दिवसांनी त्या शेतकऱ्याच्या घरी लाख दोन लाख रुपये येउन पडता. राजकारण्यांना पुळका येतो तेही काहीशी मदत करून जगभर मदतीचे फोटो उधळून likes मिळवतात. नंतर त्यांच्याकडे कोणीही फिरकत नाही. आजच्या या परिस्थितीला सरकारची इच्छाशक्ती कारणीभूत आहे, विर्रोधकांच आर्थकारण, तरुणांचा निष्काळजीपणा(आम्हाला सगळ आयत मिळतंय म्हणून),अधिकार्यांचा हुजुरेगीरीपणा,तुम्ही आम्ही सगळेच कारणीभूत आहोत.
बळीराजा, अस हे तुझ जगण्यातल वास्तव. मराठवाड्याच हे वास्तव तर आता अंगवळनीच पडलय, मराठवाड्याची जलधारा नाथसागरात पाण्याचा अभाव आहेच त्यात पाणी प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. कालच गावच्या आठवडी बाजारात गेलो होतो. चारा नसल्यामुळे पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलेली गुर तू डोळ्यावर कातडी ओढून कमी भावात नाईलाजाने खाटकाच्या स्वाधीन करत होतास, हुंदके देत देत बैलाचा कासरा खाटिकाच्या हाती सोपवत होता. जानेवारीतच हि परिस्थी तर पुढे काय ???????हा आजचाच प्रश्न नव्हे हा मराठवाड्याला पडलेला कायमचाच प्रश्न आहे.
बळीराजा यावर कायमस्वरूपी तोडगा मात्र कोणीच काढत नाही. पण तू खचून जाऊ नकोस, निसर्ग नक्कीच तुझ्याबरोबर आहे. मराठवाडा नक्कीच दुष्काळ मुक्त होईल. आवघ्या जगाचा पोशिंदा तू लाख वादळे आली,लाख दुष्काळ आली तरी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहणारा आहेस लक्षात ठेव.
बळीराजा, हे पत्र वाचत असलेला माझा प्रत्येक मित्र तुझ्या सोबत आहे . आम्ही तरुण वर्ग नक्कीच पेट्रोल, वीज, पाण्याची बचत करू. झाडे लावू. सृष्टीचक्र पूर्ववत होण्यासाठी हातभार लावू झालच तर व्यापार्यांपेक्षा थेट तुझ्याकडूनच धान्य , भाजीपाला विकत घेऊ.
पण मायबापा तू आत्महत्त्या करू नकोस……. !
                                                                                             तुला नेहमीच त्रास देणारा
                                                                                                        एक युवक
                                                                                               मयुर गोपीचंद गव्हाणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा